Posts

Showing posts with the label Poetry
सुन्न गोठली हरेक सळसळ, कुंद शांतता नीरव रानी - रातराणीचा मंद श्वासही बोचत होता पानोपानी...   भल्या पहाटे शुक्रचांदणी आभाळातून जळी उतरली, झुळुक दोर अन नीर पाळणा अंगाई मनी हळू उमटली! (2011)
मन तृषार्त चातक, मन चकोर विरही  तू रे पुनवेचा चांद कुट्ट ढगाळल्या राती  परी खुळावते जिवा तुझी लावून चाहूल  वेडे वादळ श्वासांचे अन गात्रांत भरती! (November 2016)  

कितेक वेळा

कितेक वेळा मला वाटते तप्त अग्निची शिखा बनावे  सौजन्याचे फोल मुखोटे पाचोळ्यागत जळून जावे  उडून जावे राखोळीसम तोंडदेखले शब्द बेगडी  सच्चाईच्या शीत सरींतून अन रानाने पुन्हा रुजावे! कितेक वेळा मला वाटते बनून यावे उधाण वादळ  दिल्या-घेतल्या सर्व ऋणांची उठवावी ही एक वावटळ  सुकल्या-ओल्याशा घावांवर द्यावी मग झुळकीची फुंकर  नाजूक-प्रांजळ हिरवी नाती पुन्हा फुटावी लेऊन अंकुर! (August 2015)
मज    दूर  तटाची चाड नसो वा अथांगतेचा  दंभ नको, बस चंद्राच्या नजरेत नजर अन मनात जळती आग बरी, न बोजा हो  मज  मोत्यांचा, आगबोटींची कसली पर्वा? मी लाट स्वैर अन  मज मधली या एक क्षणाची प्यास खरी! (2012)